सतरा वर्षांपूर्वी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तीर्थकुंडात गोपाळ बडवे नावाचा ‘बडवा’ लघवी करताना सुरक्षारक्षकांनी पकडला. तेव्हा ‘हे मी नेहमीच करतो,’ असं तो सहजपणे म्हणाला.
अगदी त्याच सहजतेने ”युद्धनौका Vikrant ‘विक्रांत बचाव’साठीचा निधी जमवणे, हे प्रातिनिधिक होते. जेमतेम ३५ मिनिटं आम्ही मुंबईत चर्चगेट स्टेशन बाहेर उभं राहून डबे फिरवले. त्यात किती पैसे जमणार!”
असे म्हणत ‘भाजप’ नेते किरीट सोमय्या यांनी ‘शिवसेना’ नेते व खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना झटकण्याचा प्रयत्न केला.
”१९७१ च्या भारत-पाक युद्धात ऐतिहासिक कामगिरी बजावलेल्या युद्धनौका Vikrant ‘आयएन एस – विक्रांत’चं योग्य प्रकारे प्रेरणादायी जतन- स्मारक व्हावं; ती भंगारात जाऊ नये यासाठी किरीट सोमय्या यांनी २०१३ मध्ये पुढाकार घेऊन निधी जमवण्याची मोहीम राबवली होती. ती रक्कम ५८ कोटी रुपये आहे. ती कुठे जमा केली?” असा संजय राऊत यांचा सवाल आहे.
तो माजी लष्करी अधिकारी भोसले यांना ‘माहिती अधिकारा’त मिळालेल्या माहितीनुसार ‘राजभवन’मध्ये जमा झालेला नाही. ”तो पैसा किरीट सोमय्या यांनी ‘एस बँक’मध्ये पांढरा करून आपल्या निवडणुकीसाठी आणि कंपन्यात गुंतवण्यासाठीही वापरला,” असे संजय राऊत यांचे म्हणणे आहेत.
हे पुढचे आरोप शह-काटशहाचा भाग असू शकेल. परंतु, Vikrant ‘विक्रांत बचाव निधी’चे काय झाले, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तो लोकभावनेशी खेळलेला राष्ट्रविरोधी खेळ आहे!
त्याची दखल घेऊनच हे प्रकरण पोलिसात दाखल झालं आणि मीडिया प्रसिद्धीसाठी हपापलेल्या किरीट सोमय्या यांना लपून राहून अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज करावा लागला.
तो अर्ज कोर्टाने नाकारला. (हायकोर्टात अपिलात गेल्यावर अटकपुर्व जामीन मंजूर झाला.) हे प्रकरण घोटाळ्याचे ठरले. कारण ’धर्मादाय आयुक्त’ कार्यालयाच्या परवानगीशिवाय सार्वजनिक कार्यासाठी निधी जमवणे, हे बेकायदेशीर ठरते.
जमवलेल्या निधीचे काय केले, त्याचाही अहवाल ‘धर्मदाय आयुक्त’ला देणंही बंधनकारक असतं. ते किरीट सोमय्या यांच्याकडून झालेले नाही. ‘जमवलेला निधी पक्षाकडे जमा केला,’ असं ते म्हणतात.
त्यातून ‘निधी जमवला’ हे स्पष्ट होतं. हा ‘निधी किती होता,’ ह्याला महत्त्व नाही. त्याची गोलमाल दखलपात्र आहे.
Also Visit : https://www.postboxlive.com
अशाच प्रकारे १९९०च्या अडवाणी यांच्या ‘सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा’च्या वेळी ‘संघ – भाजप परिवार’ने घरातल्या नळाचं – पिंपातलं पाणी दहा रुपये प्रति – बाटली दराने ‘गंगाजला’चा प्रतिनिधिक नमुना लोकांना जोखण्यासाठी वापरला.
नंतर राम जन्मभूमी मंदिर बांधण्यासाठी देशभरातील लाखो बंजरंगींना गावोगावीच्या विटा डोक्यावरून वाहायला लावून अयोध्येत जमवले. त्यातील एकही वीट सध्या बांधलं जात असलेल्या राम मंदिरासाठी वापरली जाणार नाही.
कारण ते मंदिर पूर्णपणे राजस्थानी दगडाचं आहे. ह्या फुकटच्या हमालीची, फसवणुकीची जाणीव मेंदूचे दगड झालेल्यांना ‘प्रातिनिधिक’चे तीर्थ पाजल्याने अजूनही होत नाही.
Also Read : https://www.postboxindia.com/शरद-पवार-सामना-आता-निकराच/